दुष्काळात मदतीचा हात देणाऱ्या पवार कुटुंबाच्या पाठीशी पाबळसह सर्वच गावे खंबीर, वंदना प्रकाश पवार यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा
वंदना प्रकाश पवार यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा
पाबळ: पाबळ आणि परिसरातील गावांवर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा भीषण दुष्काळाचे सावट आले, तेव्हा मदतीला धावून येणारे नाव म्हणजे ‘पवार कुटुंब’. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाबळमधील वाड्या-वस्त्या आणि गावठाण परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी पवार कुटुंबाने स्वखर्चाने टँकरची व्यवस्था करून नेहमीच माणुसकीचा आधार दिला आहे. याच सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून, आगामी पंचायत समिती निवडणुकीत प्रकाश बापू पवार यांच्या पत्नी सौ. वंदना प्रकाश पवार आणि प्रफुल्ल शिवले यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
पक्षाच्या माध्यमातून भरीव निधी आणत पाबळ, धामारी, जातेगाव, मुखई, हिवरे, खैरेनगर येथील अनेक वाड्या-वस्त्यांवर गेल्या काही वर्षांत सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पाबळ गावठाणातील संपूर्ण रस्ते आता कॉंक्रिटचे झाले असून, वळसेपाटील यांच्या माध्यमातून उभारलेले वीज उपकेंद्र या भागासाठी वरदान ठरले आहे. त्याचबरोबर भव्य आरोग्य उपकेंद्र आणि थिटेवाडी बंधाऱ्यामुळे या परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून राहिलेली प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे सौ. वंदना प्रकाश पवार यांनी यावेळी सांगितले.
संकटकाळात शासकीय मदतीची वाट न पाहता माजी सभापती प्रकाश बापू पवार आणि सदाशिव पवार यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले आहे. पवार कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी होत आले आहे, याचीच जाणीव ठेवत आज सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. “आमच्या अडीअडचणीत जो धावून येतो, तोच आमचा खरा लोकप्रतिनिधी,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी पवारांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रकाश बापूंच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा पाहता, त्यांच्या पत्नीला संधी देणे म्हणजे पाबळ परिसराच्या विकासाला नवी गती देणे होय, असा विश्वास यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला.
जेव्हा गावावर दुष्काळाचे संकट होते, तेव्हा प्रकाश बापूंनी स्वतः फिरून टँकरचे नियोजन केले होते, अशा आठवणींना ज्येष्ठ ग्रामस्थांनी उजाळा दिला. ही निवडणूक केवळ एका पदाची नसून ती विश्वासाची आणि कृतज्ञतेची असल्याचे मत व्यक्त होत आहे. सौ. वंदना प्रकाश पवार यांना मिळणारा हा वाढता पाठिंबा, महिला वर्गाचा मोठा सहभाग आणि तरुणांचा उत्साह पाहता, या पंचायत समिती गणामध्ये त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र असून पवार कुटुंबाचा हा बालेकिल्ला अधिक मजबूत होताना दिसत आहे.